• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- हे पक्षवाढीचेच काम आहे !

हे पक्षवाढीचेच काम आहे  !           
   
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यावेळी आबासाहेब निंबाळकर अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते एकदा यशवंतरावांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याबरोबर त्यावेळचे काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते बाळासाहेब विखे - पाटील होते.

कार्यकर्त्यांना नावाने आणि एकेरी हाक मारणे हे चव्हाण साहेबांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य होते. बाळासाहेबांना त्यांनी विचारले,' एकनाथ, जिल्ह्यात काय चाललंय ?'

बाळासाहेब म्हणाले, ' जिल्ह्यात विरोधी पक्षांचा मोर्चा आहे. ते मुळा धरणाचं पाणी मागत आहेत. पण साहेब, त्यांना कोणी साथ देणार नाही. लोक त्यांच्याबरोबर नाहीत. तुम्ही मोर्चाची काळजी करू नका.'
यावर यशवंतराव गंभीरपणे म्हणाले, ' मी वाचलंय वर्तमानपत्रात. कॉम्रेड दत्ता देशमुखांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा निघतोय. एकनाथ, दत्ताला निरोप दे. खूप मोठा मोर्चा काढ म्हणावं. मी मोर्चाला सामोरे जाऊन स्वागत करणार आणि पाणी देण्याची घोषणा करणार. ' यशवंतरावांचे हे धोरण कार्यकर्त्यांना समजेना. ते बुचकळ्यात पडले. विरोधी पक्ष मोर्चा काढणार, मुख्यमंत्री त्या मोर्चाला सामोरे जाणार आणि त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करणार. मग पक्ष कसा वाढणार ? कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यशवंतरावांनी कार्यकर्त्यांच्या मनात चाललेला गोंधळ ओळखला. ते म्हणाले, ' हे बघा, घोषणा मी करणार. मी म्हणजे कोण ? तर मुख्यमंत्री. मुख्यमंत्री कोणाचा ? तर तुमचा, म्हणजेच काँग्रेसचा, म्हणजे घोषणा कोण करणार ? तर काँग्रेस . मग भीती कशाला बाळगता ? आपला पक्षच घोषणा करणार आहे हे पक्षवाढीचे काम आहे.' यशवंतरावांनी दिलेले स्पष्टीकरण ऐकून सगळे निरुत्तर झाले.

आजपर्यंत त्यांनी यशवंतरावांच्या मुत्सद्देगिरीविषयी ऐकले होते. आज त्यांना तिचे प्रत्यक्ष दर्शन घडले.