• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७५

Vyakhyanmala 1975
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

 वर्ष तिसरे १९७५

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

‘यशवंतरराव चव्हाण व्याख्यानमाला’ ही १९७३ साली सुरू झाली. त्या निमित्ताने गतवर्षी ज्या थोर विचारवंतांची तीन व्याख्याने झाली, त्याची ही मुद्रीत प्रत वाचकांच्या हाती देतांना मनाला एक समाधान जाणवते.

साहित्या, सौंर्य, संगीत, क्रीडा, करमणूक या समाजजीवनाला समाधान देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगरपालिकेने या संदर्भात कराडची एक वैशिष्ट्यपूर्ण अभिरुची निर्माण केली आहे. त्याचबरोबर आजच्या गतिमान कालखंडात, नव्या पिढीतील समाजघटकात चिकित्सक नि अभ्यासू वृत्ती वाढीस लागावी, सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा आणि स्थित्यंतराचा परिचय व्हावा ही निकडीची गरज आहे. समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. एका प्रयत्नवादी, अभ्यासू नि यशस्वी असा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जन जागरणाचे; संस्काराचे कार्य आरंभिले आहे.

यशवंतरावजी चव्हाण कराडचे सुपुत्र आहेत, अखिल भारतीय नेतृत्त्व त्यांच्या परिश्रमांना लाभलेले फळ आहे. त्यांचा वाढदिवस हा प्रत्येक कराडकराच्या जीवनातील एक महत्त्वाच्या भावनेने हेलावणारा दिवस आहे.

यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्वरूपात दिसणारे हे नेत्रदीपक प्रज्ञाप्रचीतीचे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व कलेकलेने साकारत गेले; त्याचा विचार नि उच्चार समाज परिवर्तनाला उपकारक ठरेल या भावनेने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात निश्चित औचित्य आहे! सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा परिचय होत राहिला; विचारविवेकविमर्ष या वाचरमंथनाच्या प्रक्रिया व्यक्तीच्या जीवनावर जर संस्कार करून गेल्यातर कोणता सामाजिक अविष्कार दिसू शकतो त्याचे यशवंतरावजी चव्हाण हें मूर्तीमंत उदाहरण आहे!

जन्मत: पारंपरिक, सामाजिक किंवा आर्थिक सुबकतेचे वा प्रतिष्ठेचे आवरण यशवंतरावजींना लाभले नाही. प्रतिकूलतेची पाठशिवणी सतत चालू असताना, आत्मविश्वासाने, अभ्यासूवृत्तीने त्यांनी आपले ‘ज्ञान दालन’ प्रयत्नपूर्वक समृद्ध केले. ध्येयपूर्तीसाठी ठामपणे उभे राहून, अविचल मनोनिग्रहाने त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची साक्ष पटवली आहे. आकांश्क्षेकडे झेप घेणारी निष्ठा, वाणी, करणी यांच्या विद्यार्थीदशेतील साधना आहे! म्हणूनच नव्या पिढीने त्यांच्या व्यासंगाचा नि प्रयत्नवादाचा अभ्यास केला पाहिजे असे वाटत राहाते.