• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -महाराष्ट्राच्या राजकारणांतील समस्या -1

भारतीय नेत्यांचे मन वळविण्याएवढा विश्वास यशवंतराव संपादन करूं शकले नसते तर ज्या मार्गाने महाराष्ट्र निर्मितीची बोलणीं सुरू झाली तो मार्ग खुंटला असता. राज्य पुनर्रचनेच्या वेळीं मुंबई महाराष्ट्राला मिळू न देण्याला ज्या भारतीय नेत्यांचे प्रयत्न कारणीभूत झाले त्यांना निष्प्रभ करण्याएवढी पुण्याई यशवंतरावांनी मिळविली होती. परंतु भारतीय नेत्यांचे मन वळवूनहि मुंबई राज्यांतील सहका-यांच्या विश्वास व सहकार्य यशवतराव मिळवूं शकले नसते तरीहि महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न सुकर झाला नसता. सद्भावनेच्या वातावरणांत वाटाघाटींनी हा प्रश्न सुटला हें या घटनेचें मुख्य वैशिष्टय आहे.

प्रशासकत्व व राजकीय  नेतृत्व

उत्तम प्रशासकाचे ठिकाणीं आवश्यक असलेले गुण यशवंतरावांचे ठायीं आहेत याची जाणीव त्यांचा मुंबई राज्याचे मंत्रिमंडळांत संसदीय सचिव म्हणून समावेश झाल्यापासूनच प्रशासनाशीं संबंध येणा-या लोकांना झाली. विशेषत: ते नागरी पुरवठा खात्याचे व स्थानिक स्वराज्यखात्याचे मंत्री असतांना राज्यकारभाराचा उपक सांभाळून, कार्यक्षमतेला बाधा येऊं न देतां तो लोकाभिमुख कसा करतां येईल, या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय गुणांच्या अभिव्यक्तीला व्यापक वाव मिळाला. कठीण जबाबदारी पत्करल्यामुळे त्यांच्या गुणाचा प्रकर्षत्वाने विकासहि झाला. लोकांची गा-हाणीं मोकळेपणाने ऐकून घेऊन त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. तसेंच, लोकांचे समाधान हीच लोकशाहींतील प्रशासनाची कसोटी आहे, यावर भर देऊन त्यांनी शासनांतील अधिकारी वर्गाला नव्या मनूची जाणीव दिली. मुद्दयाला धरून आणि थोडक्यांत भाषणें करण्याची त्यांची प्रथा आपल्या देशामध्ये राजकारणी पुढा-यांनी रूढ केलेल्या परंपरेला अपवाद वाटते. प्रशासनांतील उणीवांची जाणीव असल्याचे ते जाहीररीत्या कबूल करतात. आणि मुख्य म्हणजे कोणताहि लहानसहान प्रश्न प्रतिष्ठेचा करण्याबद्दल त्यांचा आग्रह नसतो; त्यामुळे सामाजिक व्यवहाराला आवश्यक असलेली तडजोड होण्यास मदत होते. मुंबईमध्ये हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यास संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागणीला यशवंतरावांनी जें उत्तर दिलें आणि ज्या रीतीने दिलें तें या वृत्तीचें निदर्शक आहे.

परंतु प्रशासकीय गुणांपेक्षाहि राजकीय नेतृत्वाचे गुण यशवंतरावांच्या महाराष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये विशेष दिसून आले. त्यांचे नेतृत्व प्रभावी होण्याला तीन गुण प्रामुख्याने कारणीभूत झाले आहेत. राजकीय घटनाबाबत त्यांचा दृष्टिकोन वास्तववादी असतो आणि धोरणाबद्दल त्यांची भूमिका व्यावहारिक असते. ठोकळेबाज तत्त्वज्ञान किंवा भोंगळ आदर्शवाद यांचा पगडा यशवंतरावांवर कधीहि बसला नाहीं. पण त्यांची भूमिका व्यावहारिक असली तरी संधिसाधूपणाची नसते. याचे कारण राजकीय प्रश्नांबद्दल अभ्यासू दृष्टि स्वीकारून विचाराच्या बैठकीवर त्यांची भूमिका बनत असते.  संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबद्दल त्यांची वैचारिक भूमिका घट्ट होती. मुंबई विधानसभेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसची या प्रश्नाबद्दलची भूमिका विशद करणारें जें भाषण यशवंतरावांनी केलें होतें त्यामध्ये ही घट्ट वैचारिक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. परंतु व्यावहारिक दृष्टिकोनांतून ज्यावेळीं संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पर्याय स्वीकारावा लागेल असें दिसूं लागलें, त्यावेळी यशवंतरावांनी त्यांतल्या त्यांत जवळचा असा विशाल द्विभाषिकाचा पर्याय स्वीकारण्यास अनमान केली नाही. केवळ तत्त्वाचा अट्टाहास म्हणून व्यवहार्यतेकडे त्यांनी डोळेझाक केली नाही. मुंबई राज्याचा कारभार प्रशासनाचे दृष्टीने चांगला चालला होता तरीहि लोकशाही पद्धतीमध्ये अभिप्रेत असलेलें भावनात्मक ऐक्य द्विभाषिकांत साधेलसें दिसत नाही, अशी खात्री झाल्याबरोबर यशवंतरावांनी द्विभाषिकाचा फेरविचार सुरू करण्यास चालना दिली. नेहरूंच्या प्रतापगडभेटीचे वेळचा सं. म. समितीचा मोर्चा हा यशवंतरावांच्या विचारास चालना देणारा ठरला असावा. वास्तवादी दृष्टिकोनामुळे त्यांनी महाराष्ट्रीय मनावर संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाची पकड किती पक्की बसली आहे तें जाणलें व्यावहारिक भूमिकेमुळे राज्यपुर्नरचनेचा प्रश्न त्यांची प्रतिष्ठेचा केला नाही. उलट लोकशाही मार्गावरील निष्ठेमुळे लोकांचे समाधान करण्याचा लोकशाहीवादी मार्ग पत्करण्याची तत्परता त्यांनी दाखविली.

अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती अनुकूल वातावरणामध्ये होण्यास यशवंतरावांचें नेतृत्व ब-याच अंशी कारणीभूत झालें आहे. आता महाराष्ट्र राज्य स्थिर झालें आहे. प्रश्न आहे तो या राज्याच्या विकासाचा कारण महाराष्ट्र राज्यनिर्मिती हें कांही अंतिम साध्य नाही. मराठी जनतेच्या सर्वांगीण विकासांत आणि भारतीय जीवनाच्या विकासामध्ये मराठी जनतेला यशाशक्ति हातभार लावणें शक्य करण्याचें एक प्रमुख साधन म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची मागणी होती.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती हें महाराष्ट्र समाजाला, विशेषत: महाराष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान आहे. भारतीय राजकारणामध्यें महाराष्ट्राला योग्य स्थान नाहीं ही तक्रार राहणार नाहीं अशी परिस्थिती निर्माण करण्याचे एक साधन म्हणून नव्या राज्याची वाटचाल कशी होते, यावरूनच नेतृत्वाचा कस लागणार आहे.